Skip to content Skip to footer

मोदी आणि शहा या राजद्रोह कृत्यासाठी माफी मागणार का? तृणमूल काँग्रेसचा सवाल

तृणमूल युवा काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी यांनी केलल्या दाव्यानुसार, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हावडामध्ये एका सार्वजनिक रॅलीत राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीने गायले होते. यावरून पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शीतयुद्ध रंगले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार, ‘देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा प्रचार करणारे राष्ट्रगीतही योग्य पद्धतीने भाजपा म्हणू शकत नाहीत. हा तोच पक्ष आहे जो भारताच्या सन्मान आणि गौरव कायम राखण्याचा दावा करतो. लज्जास्पद! नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप या ‘राष्ट्रद्रोही’ कृत्यासाठी माफी मागणार?’ असे ट्विट अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे.

तसेच तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनीही यांसदर्भात एक ट्विट केलंय. भाजपनं राष्ट्रगीताचा अपमान केला आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5