Skip to content Skip to footer

“…मात्र प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली.” – संजय राऊत.

 

शिवसेनेने भाजपचा हात सोडून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांनतर तब्बल दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर ७ फेब्रुवारी रोजी थेट वक्तव्य केले. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी “शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती.” असे वक्तव्य केले होते. तब्बल दीड वर्षांनी अमित शहा यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधल्यामुळे शहा यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले होते.

यावर राऊत यांनी शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, “१९७५ साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर १९९० मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली.”

Leave a comment

0.0/5