Skip to content Skip to footer

“तर लोकांचा इडीवरचा विश्वास उडेल.” एकनाथ शिंदे यांची केंद्रावर टीका.

“राजकीय हेतूने प्रेरित होऊन, तसेच सूडाची भावना लक्षात घेऊन ईडी सारख्या संस्थांचा वापर केला जाऊ नये. जर अशा पद्धतीने ईडीचा वारंवार वापर केला जात असेल, तर ईडीवर लोकांचा विश्वास राहणार नाही.” अशी टीका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकरवर केली होती.

मागच्या काही महिन्यात आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांना आणि आमदारांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या नोटीसा धाडण्यात आल्या होत्या. ईडीची कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेली आहे. अशी टीका केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यावर होत होती याच पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान केले होते.

नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका तसेच नगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासह अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5