Skip to content Skip to footer

मंत्री राजेश टोपे यांचे राज्यातील जनतेला पत्रं, काय लिहिले आहे पत्रात वाचा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यात मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी मधील अनेक मतबल नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सुद्धा काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यात आता मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे.

राजेश टोपे आपल्या पत्रात लिहितात की, मागच्या एक वर्षपासून आपण सर्व कोरोना विरोधात लढा देत आहोत. राज्य सरकारची खंबीर भूमिका आणि ठोस उपाययोजनांमुळे तसेच जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योध्ये विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळं आपण करोना नियंत्रित करु शकलो असे म्हणत राजेश टोपे यांनी करोना योध्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.

पुढे ते लिहितात की, अद्याप करोना गेला नाहीये. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामुहि लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या रुग्णालयात करोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून करोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सदभावना,प्रेम यामुळे त्याला हरवून पुन्हा एकदा कोरोना विरुध्दच्या सामुहिक लढाईत सहभागी होणार आहे.

‘समजदार, संवेदनशिल व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे . म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला.मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही.लॉकडाऊन टाळण केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क,सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा असं भावनिक आवाहन त्यांनी पत्राद्वारे सामान्य जनतेला केले आहे.

Leave a comment

0.0/5