Skip to content Skip to footer

रिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी (नक्की वाचा)

रिलेशनशिप बिल्ट करणे अन टिकवणे इतकी सोपी गोष्ट नाही हे अनेकाना चांगलेच समजले असेल. रिलेशनशिप मेंटेन ठेवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते. प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नाच्या नात्यात अनेक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो. अडचणी का येतात याची कारणे अनेक असतील. अडचणी काही सांगून येत नसतात. परंतु असे लक्षात आले आहे, कधी कधी एखाद्याच्या चुकीच्या सवयी त्याला अडचणीत आणायला कारणीभूत असतात.

म्हणूनच रिलेशनशिप धोक्यात अणणाऱ्या अशाच काही सवयींची माहिती स्मार्टने नेटवरून गोळा केली आहे. अश्या सवयी, ज्यामुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं किंवा तुम्ही कुणासोबतही रिलेशनमध्ये राहू शकत नाही. सवयी, ज्या तुम्हाला एकटे पाडू शकतात.

वाईट सवयी, ज्या पुरुषांमध्ये असतात, अन महिलांमध्येही बघायला मिळतात… वाचा तर अश्या सवयी ज्या रिलेशनशिपला धोक्यात आणू शकतात.

1) जास्त प्रेम, तेही स्वतःवर :
अनेकांना स्वत:वरच जास्त प्रेम असतं. म्हणजे त्यांच्या सानिध्यात कितीही चांगला, कितीही सुंदर, कितीही हुशार व्यक्ती असला तरी त्यांना दुस-याचं काहीच वाटत नाही. ते स्वत:मध्येच गुंग असतात. मी अन माझे जग.. असा जपच ते करत असतात.

“मी” या शब्दापलिकडे तुम्ही कधीही बघत नसाल, तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. “मी” पणा हा मनुष्याचा मोठा शत्रू आहे. जर तो तुमच्यात असेल तर तुम्ही कधीही कुणासोबत रिलेशनमध्ये राहू शकणार नाहीत. तुमच्याशी कुणालाही नातं जोडावं वाटणार नाही. कारण तुम्हाला समोरच्या व्यक्तीपेक्षा स्वत:त जास्त रस आहे.

तसेच, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर, अर्थातच तुम्ही जितक्या तुमच्या गोष्टी शेअर करता तेवढ्याच गोष्टी तुमच्या जोडीदाराच्याही ऐकाव्या लागतात. पण केवळ तुम्ही तुमचीच पिपाणी वाजवत राहिला तर, या नात्यात संवाद कसा होईल? दुस-याचंही ऎकून घेण्याची तुमची तयारी हवी. दुस-यांचं ऎकणं आणि ते समजणं हे खूप महत्वाच आहे. जर तुम्ही असं करत नसाल तर तुम्ही रिलेशनमध्ये राहू शकत नाही.

2) कमिटमेंट फोबिया :
लता दिदींनी एका गाण्यात म्हटले आहे, “वादा किया तो निभाना पडेगा…कोणत्याही नात्यात काही वेळानंतर कमिटमेंट तर करावीच लागते. कारण कमिटमेंटशिवाय नात्याचं काहीच भविष्य नाही. अशात जर तुम्ही कमिटमेंट करण्यापासून दूर पळत असाल तर तुमच्या साथीदाराच्या मनात तुमच्याविषयी अविश्वास वाटू शकतो. काही दिवसात तो तुम्हाला सोडू शकतो. कमिटमेंट न करणं किंवा त्यापासून दूर पळणं हे नात्याला संपवतं. अशात एकतर साथीदारासोबत कमिटमेंट करा नाहीतर एकटे रहा.

3) फ्रीडम, अती फ्रीडम :
जोपर्यंत तुम्ही सिंगल असता तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाने काहीही करू शकता. कुणीही तुम्हाला काहीही म्हणणार नाही. पण तेच जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल किंवा तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल तर त्यांच्याकडून तुम्हाला अनेक गोष्टींची विचारणा होऊ शकते. प्रत्येक गोष्टीला अडसरही केला जाऊ शकतो. अशात जर तुम्हाला स्वत:त काहीही बदल करायचा नाहीये, तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यात मश्गूल असाल तर तुम्ही रिलेशनमध्ये राहू शकत नाही.

4) जोडीदारापेक्षा फोनमध्ये जास्त लक्ष :
अलिकडे हे प्रमाण खूप वाढलंय. अनेकजण जोडीदारापेक्षा मोबाईल फोनमध्ये डोकं घालून बसलेले असतात. अनेक स्त्रिया मोबाईलला त्यांची सवत समजायला लागल्या आहेत. कारण त्यांचे पती 24 तास मोबाईलला चिकटलेले असतात. असंच तुमच्याही नात्यात होऊ शकतं. तुम्ही गर्लफ्रेन्ड किंवा बॉयफ्रेंड तुमच्यासोबत असूनही मोबाईलमध्ये व्यस्त असाल तर तुमचं रिलेशन धोक्यात आहे.

5) मित्रांचा, अन मैत्रीचा अतिरेक :
अनेकजण असे असतात, ज्यांना एका व्यक्तीच्या नात्यात बांधल्या जाण्यापेक्षा दोस्तांच्या गराड्यात राहण्यात जास्त आनंद असतो. मित्रांसोबत कुठेही जायला तुम्ही एका पायावर उभे असता. पण जर तेच तुमच्या जोडीदारासोबत कुठे जायचं म्हटल्यावर तुमच्या जीवावर येत असेल तर तुम्ही आधीच सावध व्हा. तुमच्या जोडीदारालाही वेळ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. काही प्रमाणात मित्रांना वेळ देणे हे समजू शकते. परंतु सतत मित्रांमध्ये रममाण होणे हे चुकीचेच. अन हीच चूक तुम्हाला एकटं पाडू शकतो.

Leave a comment

0.0/5