Skip to content Skip to footer

मीरा रोड येथे राहणाऱ्या मराठमोळ्या ऋतुजा रावण हिने ‘मिस इंडिया’चे उपविजेतेपद पटकावले

पुन्हा एकदा मीरा रोड येथे राहणाऱ्या मराठमोळ्या तरुणीने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या डियाडेम मिस इंडिया २०२० मध्ये द्वितीय उपविजेतेपद ऋतुजाने पटकावले आहे. मीरा रोडमधील घरी आल्यावर ऋतुजा रावणचा सत्कार करण्यात आला.

ऋतुजा रावण सध्या एका विमान सेवा कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून नोकरी करते. डियाडेम मिस इंडिया २०२० च्या 2nd runnerup होण्यापर्यंत ऋतुजाचा प्रवास सोप्पा नव्हता. त्याचे कारण म्हणजे या क्षेत्रातील अनुभव अगदीच नगण्य होता.

नवीन क्षेत्र आणि प्रचंड स्पर्धा याची माहिती असतानाही केवळ आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर तिने यश मिळवले आहे. वडिलांचे छत्र हरपलं असतानाही आपल्या आईचा आधार, या ताकदीवर ऋतुजा रावणने या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले.

यावर बोलताना टी म्हणाले की, पहिल्या तीन क्रमांकात येईन, याची कल्पनाही नव्हती माझी कल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याचं पाहून मला अत्यानंद होत आहे. राष्ट्रीय स्तरावर मला माझ्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला मिळाले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आज जरी मी विजेती असले, तरी मी मला मिळालेल्या अनुभवावरुन, माझी आई आणि सर्वच मित्रमंडळी यांच्या सहकार्याच्या आधारावर पुढे भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी बांधील असेन, तसा यशस्वी प्रयत्न मी नक्कीच करेन, असा विश्वासही ऋतुजाने व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5