Skip to content Skip to footer

अहमदनगर मधील पाणी प्रश्नांसाठी खासदार विखे यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट.

आज मुंबई मंत्रालय येथे राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री श्री. जयंतजी पाटील यांच्या समवेत साकळाई उपसा सिंचनातील सर्व्हेच्या कामास मंजुरी देऊन त्यासाठी त्वरित निधी उपल्बध करून देणे, कुकडी डाव्या तलावाच्या दुरुस्तीसाठी व उर्ध्व प्रवरा (निळवंडे-२) प्रकल्पासाठी निधी मिळण्याबाबतीत तसेच याद्वारे ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यास चालना देण्यासाठी मंत्री महोदयांना मागणी केली.

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेती व घरगुती वापरासाठी योग्य पद्धतीने पाणी पुरवठा होत नसून पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धरणामध्ये पाणी असूनही नियोजन व कालवे तसेच इतर गोष्टींच्या कमतरतेमुळे हे पाणी गावागावात पुरविण्यास अडथळा होत असल्याची माहिती मंत्री महोदयांना देऊन याबाबतीत सकारत्मक निर्णय घेऊन त्वरित या सर्व कामांसाठी भरीव निधी देण्याची मागणी केली.

Leave a comment

0.0/5