महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन या तारखेला पार पडणार वाचा….!
यंदा कोरोनाच्या संकटात पावसाळी अधिवेशन होणार की नाही हाच प्रश्न सर्व राजकीय पक्षांना पडलेला असताना येत्या ७ सप्टेंबरला पावसाळी अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. हे अधिवेशन मुंबई येथे पार पडणार असून याबाबतची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करण्यात येणार आहे.
कामगार समितीच्या झालेल्या बैठकीत येत्या ३ ऑगस्ट रोजी अधिवेशन घेण्याचे ठरले होते. मात्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आधीच प्रशासनावर ताण पडलेला दिसून येत आहे. तसेच कोरोनाच्या परिस्थितीत हे अधिवेशन घेणे म्हणजे संसर्ग वाढण्याची दाट शक्यता नाकारता सुद्धा येणार नाही
या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले गेले. आता हे अधिवेशन 7 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात