Skip to content Skip to footer

औरंगाबादमध्ये ढगफुटीच्या व्हायरल बातम्यांमुळे भीतीचे वातावरण

औरंगाबादमध्ये ढगफुटीच्या व्हायरल बातम्यांमुळे भीतीचे वातावरण

संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे हाहाकार माजलेला दिसून येत आहे. त्यातच मुंबई, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात ही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद मध्ये मागच्या तीन दिवसांपासून धुवांधार पाऊस सुरू आहे.

जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागात या पावसामुळे अतोनात हाल होत असून, शेती व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होत असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यातच व्हॉट्स ऍप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर सातत्याने जिल्ह्यात ढगफुटी झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहे. काही ठिकाणी तर जुने व्हिडिओ आणि फोटोज् व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनावर भीतीचे ढग वावरत आहेत.

परंतु प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले जात आहे.

Leave a comment

0.0/5