Skip to content Skip to footer

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव सरकारने वापरणे हा गुन्हा आहे का? – संजय राऊत

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव सरकारने वापरणे हा गुन्हा आहे का? – संजय राऊत

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्दयावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनेकदा औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आला. यावरून आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली होती.

यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. जी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली ती योग्य असून सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालते आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव सरकारने वापरणे हा गुन्हा आहे का? सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचे नाव वापरणे हा गुन्हा आहे, असे मला वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालते.

राऊत यांना प्रश्न विचारताना पत्रकारांनी सरकारी ट्विटरवर औरंगाबादचं नाव संभाजीनगर असे वापरण्यात आले आहे. यावर शिवसेनेने सरकारी यंत्रणेचा असा उपयोग करु नये, काय लिहायचे असेल ते सामनामध्ये लिहावे असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले.

Leave a comment

0.0/5