Skip to content Skip to footer

विकास दुबे यांच्या चकमकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया….!

विकास दुबे यांच्या चकमकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया….!

“विकास दुबेसारखी जी लोकं निर्माण केली जातात. ती अनेक राजकारण्यांची गरज असते. निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी असे लोक काही राज्यात पोलीस, राजकारणी तयार करतात. विकास दुबेही अनेक पक्षांशी संबंधित होता. याला राजकारण जबाबदार आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचे राजकारण होणं धोकादायक आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“विकास दुबेला एक पक्ष विधानसभेचं तिकीट देणार होते. पण तो सरेंडर झाला नाही म्हणून मिळालं नाही”, असा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊत यांनी केला. आज झालेल्या चकमकीवर बोलताना संजय राऊत यांनी, “त्या राज्याची प्रतिमा धुळीस मिळाल्यानंतर अशी कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थन केलं नाही तरी पोलिसांचे खच्चीकरण होईल अशी भूमिका राजकीय पक्षाने घेऊ नये. बिहार, उत्तर प्रदेशात तर सब हमाम मै नंगे अशी परिस्थिती आहे,” असेही सांगितले.

Leave a comment

0.0/5