Skip to content Skip to footer

बारामतीच्या भानामती या वेळी चालणार नाही – उद्धव ठाकरे

मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संसदरत्न खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची झंझावात सभा मावळ मतदार संघात मोठ्या जनसंख्येने पार पडली. आज संपूर्ण महाराष्ट्र फिरून झाले आहे आणि यात संपूर्ण राज्य हे भगव झालेलं या परिस्थितीला दिसून येत आहे. कोल्हापूरकरांनी सांगितलं आमचं ठरलंय हे वाक्य विरोधकांनी उचललं. आम्ही विचारलं काय ठरलंय? आमचं ठरलं की घरीच बसायचं असा टोला विरोधकांना लगावला. या बारामतीच्या भानामती यावेळी महाराष्ट्रात चालू देणार नाही असे सुद्धा सांगितले. या सभेला मावळ मध्ये राष्ट्रवादी सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराची सुद्धा आठवण करून दिली

.
पाऊस पडत नाही तेव्हा आम्ही काय धरणात…. असं बोलणाऱ्यांना तुम्ही तुमचे मत देऊ शकता का? असा सवाल उपस्थित जनतेला उद्धव ठाकरे यांनी केला. मी नाहीतर माझा मुलगा नाहीतर माझा पुतण्या. दुसऱ्यांना काही मुलं होत नाहीत का? आज साताऱ्या मध्ये आम्ही एका माथाडी कामगारांच्या मुलाला तिकीट दिली. अण्णासाहेब पाटील म्हणाले होते की माथाडी कामगारांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही. अण्णासाहेब यांनी आपले आयुष्य संपवून घेतले होते. त्यामुळे आम्ही ठरवलंय दिल्ली पुन्हा काबीज करायची.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आणि त्यासाठी बारणे आमचे पुन्हा खासदार होणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आज वीर सावरकरांना नाव ठेवणाऱ्या राहुल गांधी यांच्या मांडीला-मांडी लावून आपले नेते शरद पवार बसत आहे. माझा बारामतीकरांना प्रश्न आहे. तुमचा नेता क्रांतिकारकांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा डरपोक म्हणून उल्लेख करतो. जर देशासाठी त्याग करणाऱ्या सावरकरांबद्दल जर त्यांना आदर नाही तर आम्हालाही त्यांचा आदर नाही. अशी गर्जनाच उद्धव ठाकरे यांनी सभेला केली. शरद पवार म्हणाले होते की पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही अंगाला भस्म लावून तोंडाला काळे फासून हिमालयात जाईल. पण पुन्हा काँग्रेस बरोबर युती केली. आपल्या भाषणाच्या शेवटी जमलेल्या नागरिकांना उद्देशून म्हणाले की, तुमचा हात बळकट करण्यासाठी आपल्या युतीचा उमेदवाराला लोकसभेत पाठवा अशी विनंती मी आपल्या समोर करतो.

Leave a comment

0.0/5