Skip to content Skip to footer

आमच्या पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील जागा वाढणार – अमित शहा

अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजार होते. पंतप्रधान मोदींची ही गेल्या पाच वर्षातली पहिली पत्रकार परिषद होती. देशभरातील सर्व ठिकाणच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर मोदींनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. भाजपा यावेळी ३०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा मोदी आणि अमित शाहांनी केला आहे. शिवाय पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही जागा वाढतील, असं ते म्हणाले. ईशान्य भारतातील सात राज्य, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि महाराष्ट्रातही आमच्या जागा वाढतील, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या.

उत्तर प्रदेशात भाजपने गेल्या निवडणुकीत ८० पैकी ७२ जागा जिंकल्या होत्या. पण सपा आणि बसपाने यावेळी भाजपा समोर आव्हान उभे केले आहे. पण या आव्हानाचा काहीही परिणाम होणार नसून ७४ पेक्षा एकही जागा कमी जिंकणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. ओदिशा, पश्चिम बंगाल, दक्षिण भारत आणि ईशान्य भारत या भागांमध्ये भाजपने जागा वाढवण्यासाठी जोर लावला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरही अमित शाहांनी भाष्य केले. गेल्या दीड वर्षात पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ८० कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कसा न्याय देतील? असा सवाल पत्रकार परिषदेत अध्यक्ष अमित शाह यांनी उपस्थित केला आहे.

Leave a comment

0.0/5