Skip to content Skip to footer

जागेच्या वादावरून माझ्या कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून चुकी झाली असावी – शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पहिल्याच रांगेत स्थान होते असे काल राष्ट्रपती भवनाने स्पष्ट केले होते. शरद पवार यांनी राष्ट्रपती भवनाच्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ३० मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण होते. मात्र शरद पवार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. शरद पवारांना पाचव्या रांगेत स्थान दिल्याने ते नाराज झाल्याचे बोलले जात होते, याप्रकरनावरून अनेक राजकारणही झाले. दरम्यान, राष्ट्रपती भावनाने या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

शरद पवारांसाठी पहिल्या रांगेतलं VVIP आसन ठेवले होते. याच रांगेत वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ नेते बसलेले होते. शरद पवारांच्या ऑफिसमधल्या कुणाचा तरी गोंधळ झाल्यामुळे हा गैरसमज झाला असावा. त्यांनी VVIP मधल्या फक्त V वरून पाचवी रांग असे मानले असावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचे प्रेस सेक्रेटरी अशोक मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, जागेबाबत माझ्या सचिवाकडून दोनदा चौकशी करण्यात आली होती, मात्र कुठलीही प्रतिक्रिया येत नव्हती. जागेवरून माझ्या कार्यालयात चूक झाली असावी, असे शरद पवार यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर, रांगेचा वाद मोठा नाही, तो विषय आता संपला आहे. असेही त्यांनी म्हंटले.

Leave a comment

0.0/5