Skip to content Skip to footer

युती बद्दल गैरसमज पसरवणाऱ्या विरोधात उद्धव ठाकरे पाठवणार अमित शहांना पत्र…..

भाजपा-शिवसेना युतीमध्ये खडा टाकणा-यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे समजतं आहे. युतीमध्ये तणाव निर्माण होईल अशी वक्तव्य करणा-या नेत्यांवर यापुढे कारवाई होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहेत. अशा नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी पत्रात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हा नियम लागू असेल, असंही सूत्रांनी सांगितले.

भाजपा आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा युती झाली असली तरी दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस कायम आहे. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा…मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणं घेणं नाही. ते वेळ आल्यावर पाहू असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुष्काळी दौऱ्यावर केले आहे. तर शनिवारीही उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाच मोठा भाऊ असून भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला. तर आमचं ठरलंय दुसऱ्यांनी त्यात नाक खूपसू नये असा टोला उद्धव ठाकरेंनी महाजनांना लगावला होता.

Leave a comment

0.0/5