Skip to content Skip to footer

शिवसेना नरमली नाही जे ठरलं होत तेच होणार – संजय राउत

शिवसेना नरमली नाही जे ठरलं होत तेच होणार – संजय राउत
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीमध्ये जागावाटपा बाबत एकमत होताना दिसत नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकापूर्वी ठरलेल्या युतीच्या फॉर्मुल्यावरून युटूर्न घेतलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची आसच मनात बाळगलेली दिसून येत आहे. यावर युतीच्या फॉर्मुल्याची आठवण करून देताना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आणि फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिलेले आहे.
शिवसेना नरमली, माघार, तडजोड, समसमान पदांची मागणी सोडली वगैर पुडया सुटू लागल्या आहेत, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेविषयी भाजपाला लक्ष करत फॉर्मुल्याची आठवण करून दिलेली आहे. ये पब्लिक है. सब जानती है. जे ठरले होते त्या प्रमाणेच होईल, असे पुन्हा एकदा राऊत यांनी सत्ता स्थापनेविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी संभ्रम आहे.

Leave a comment

0.0/5