सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या राज्यपालांच्या विरोधातल्या याचिकेवर तूर्तास सुनावणी देण्यास नकार दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी फेटाळण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र शिवसेनेच्या या याचिकेवर तत्काळ सुनावणी होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल आहे.
राज्यात सत्ता स्थापनेचा घोळ कायम आहे, भाजपने आपली असमर्थता दाखवल्या नंतर राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनाल बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावले. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावले असले तरी पूर्ण वेळ मात्र दिला गेला नाही. त्यामुळे शिवसेनेलाही बहुमत सिद्ध करता आले नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.