Skip to content Skip to footer

राज ठाकरेंच्या रंगीत-संगीत मागणीवर सामनातून जोरदार हल्ला

राज ठाकरेंच्या रंगीत-संगीत मागणीवर सामनातून जोरदार हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाईनची दुकाने चालू करण्याचा विचार राज्य शासनाने करावा असे पत्र लिहिले होते. मात्र आज सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरेंच्या त्या मागणीचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली?, असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

 व हाणामारी. लोकं भाजी, अन्न, धान्य वगैरे शिस्तीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेत आहेत, पण वाईन शॉपबाहेर रांगा लागतील तेव्हा काय नजारा असेल त्याची कल्पनाच करवत नाही, अशा शब्दात अग्रलेखातून पुढच्या संभाव्य परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5