महाराष्ट्रातून कोणीही काही ओढून नेऊ शकत नाही! – उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातून-कोणीहीनव्या वर्षाचे स्वागत करा, करोनाचे नाही!-का-From Maharashtra-anyone-why

महाराष्ट्रातून कोणीही काही ओढून नेऊ शकत नाही! – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे, असे सांगतानाच राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रातच उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मॅग्नेटिक महाराष्ट्रसाठी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही, असे ठाकरे म्हणाले.

‘स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर ते शक्य होणार नाही’, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता दिला. महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे ११३ वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्यासोबत असते. हे तुम्हाला सांगता येईल, असे सुद्धा यावेळी बोलून दाखविले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here