Skip to content Skip to footer

पुन्हा कोल्हापूरला जाणार असे म्हणणाऱ्या चंद्रकांतदादा पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात की,

एका वर्षात पुन्हा कोल्हापूरला परतणार असल्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे म्हंटले होते. काल विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. आत त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.
सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, “निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होत असा टोला पवारांनी लगावला होता.

Leave a comment

0.0/5