कोलंबो क्रिकेट - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने चौथा क्रिकेट एकदिवसीय सामनाही जिंकला.
धावांचे भलेमोठे पाठबळ मिळाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले आणि लंकेचा डाव २०७…