Skip to content Skip to footer

सुशांतला दुर्दैवाने मृत्यूनंतर जास्त प्रसिद्धी मिळते – मंत्री जयंत पाटील

सुशांतला दुर्दैवाने मृत्यूनंतर जास्त प्रसिद्धी मिळते – मंत्री जयंत पाटील

सिने-अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र या अत्म्हत्येनंतर चित्रपट सृष्टीतील वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत होते. त्यातच अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणात उडी घेत अनेक तर्क-वितर्क लावण्यास सुरवात केली होती. या सर्व तर्क-वितर्कांवर राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.

सुशांत सिंह यांच्या आत्महत्येनंतर त्याला दुर्दैवाने जास्त प्रसिद्धी मिळत आहे, अशी खंत यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच सुशांत चांगला, दर्जेदार कलाकार होता, त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीचे नुकसान झाले आहे, असं ही पाटील यावेळी म्हणाले.

पण हा विषय पोलिसांच्या सरळ चौकशीवर मर्यादीत ठेवावा. त्याचा चिघळून चोथा करण्यात अर्थ नाही. त्याने आत्महत्या केलीय, जो चौकशी अधिकारी आहे त्यांने वस्तुस्थिती समोर आणावी आणि याला पूर्णविराम द्यावा, असंही ते यावेळी म्हणाले.

Leave a comment

0.0/5