Skip to content Skip to footer

उपमुख्यमंत्री अजित पवार आज भरवणार जनता दरबार

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबई येथे राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यलयात जनता दरबार भरवणार आहे. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांमध्ये अजित पवारांचा जनता दरबार अधिक लोकप्रिय असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक अजित पवारांकडे आपल्या समस्या घेऊन येतात. त्यांच्या समस्या एकूण दादा त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.

अजित पवार यांची बोलण्याची जशी एक स्टाईल आहे. तशी ती कामाच्या पद्धतीमध्येही पाहायला मिळते. लोकांनी मांडलेले प्रश्न समजून घेत, त्यांच्या स्टाईलने ते अधिकाऱ्यांना फोन करुन लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अन्य मंत्र्यांचे जनता दरबार साधारण दोन तास चालत असले, तरी अजितदादांचा जनता दरबार मात्र चार तास चालतो.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य मंत्रीही जनता दरबार घेतात. त्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे अशा अनेक मंत्र्यांचा समावेश आहे.

Leave a comment

0.0/5