दिल्ली समोर ना शरद पवार झुकले, ना उद्धव ठाकरे झुकणार – संजय राऊत
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटले तरी अजून काही सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना आणि भाजपा पक्षाकडून करण्यात आलेला नाही आहे. त्यातच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लोकसभा निवडणुकीला ठरलेल्या फॉर्मुल्याची आठवण देताना ठरल्या प्रमाणे अडीज-अडीज वर्ष सेना भाजपा पक्षाचा मुख्यमंत्री बसवण्याची आठवण पुन्हा एकदा भाजपा नेत्यांना करून दिलेली आहे.
यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फॉर्मुल्याची आठवण करून देताना भाजपा नेत्यांना फैलावर घेतलेले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी भाजपला धारेवर धरलेले आहे. त्यांनी वारंवार मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार अशी मागणी केली आहे. तसेच कधी पत्रकार परिषदेच्या तर कधी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राउत यांनी आजही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या भुमिकेविषयी बोलताना दिल्लीसमोर ना शरद पवार झुकले, ना उद्धव ठाकरे झुकणार असं विधान केले आहे. त्यामुळे याआधी दोन वेळा भेट घेतलेले राउत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची स्तुती केली आहे.
पुढे बोलताना संजय राउत यांनी ‘राष्ट्रपती राजवट हा भाजपचा डाव आहे, पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्रात कुठलाही पॅटर्न चालणार नाही. महाराष्ट्र कुणालाही घाबरत नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी सरकार बनवावं असंही त्यांनी म्हटले आहे.