Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन !!

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. ब्रिटिश जुलमाच्या विरोधात १८५७ च्या उठावावेळी ब्रिटिशांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे पहिले वीर म्हणून आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे नाव काढले जाते.

‘ब्रिटिशांच्या विरोधात तळागळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात राजे उमाजी नाईक यांचे मोठे योगदान होते. त्यांनी “स्वातंत्र्याचा जाहीरनामा” काढून अनेक घटकांना संघटित करण्याचे प्रयत्न केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले. अशा या महान आद्यक्रांतीवीरास विनम्र अभिवादन’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादनात म्हटले.

Leave a comment

0.0/5