माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला

आज सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श श्रद्धांजली वाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातील नात्याला उजाळा दिला. तसेच राष्ट्रपती पदासाठी त्यावेळी घडलेल्या घटनांनाही त्यांनी उजाळा दिला. प्रणवदांचे कुणाशीही वैर नव्हते. भाषणबाजी पेक्षा त्यांना काम जास्त महत्वाचे वाटे. प्रणवदा यांनी अनेकदा त्याकाळच्या सरकारला वाचवले आहे, ‘पक्षाला वाचवले’, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले होते.

जेव्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जी यांना उघड पाठिंबा दिला. त्यावेळी प्रणवदा शरद पवार यांच्यासोबत मातोश्रीवर आले होते. आमची तेव्हा पहिली भेट झाली होती. अशा जुन्या आठवणींना मुख्यामंत्र्यांनी उजाळा दिला.

पुढे बोलताना त्यांनी प्रणव मुखर्जी मुंबईत आल्यावेळी घडलेला किस्सा सभागृहात सांगितला होता. ‘एकदा ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडून बोलावणे आले. भेटल्यावर त्यांनी महापालिका निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केलं. ते म्हणाले मला वाटलं नव्हतं मी राष्ट्रपती होईन, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झालो. हे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे’, असं त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण रात गयी बात गयी , खुर्ची मिळाली की विचार करत नाहीत, अशा शब्दात त्यांनी भाजपला चिमटा काढला

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here