Skip to content Skip to footer

नारायण राणे यांना खरा धोका दोन गुंड प्रवृत्तीच्या मुलांपासून आहे – विनायक राऊत

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. निर्णयावरून आघाडी सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत होती.
तसेच या निर्णयानंतर खासदार नारायण राणे यांनी आघाडी सरकारवर बेछुड आरोप लगावले होते. माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर त्याला ठाकरे सरकार जबाबदार असेल असे बोलून दाखविले होते.

आत या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ” राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे. बाकी त्यांना कोणताही धोका नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये”, अशी टीका  राऊत यांनी सोमवारी चिपळूण येथे केली होती .

नारायण राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे. निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसविले. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असे वाटले होते. परंतु त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही असा टोला राऊत यांनी लगावला होता.

 

Leave a comment

0.0/5