Skip to content Skip to footer

अर्णब गोस्वामींचे कोर्ट मार्शल करणार का? संजय राऊत यांचा सवाल

TRP घोटाळा प्रकरणी आर रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढलेल्या दिसून येत असताना गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांना पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याबाबत आधीपासूनच माहिती होती असे समोर आले आहे.

दरम्यान यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला जात असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामी यांचे कोर्ट मार्शल करणार का? अशी विचारणा मोदी सरकारला केली आहे. आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचे आधीच माहिती होते हे दिसून येते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांचे कोर्ट मार्शल झालं पाहिजे. तसेच यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेत्यांनी यावर भाष्य करण्याची मागणी देखील केली आहे. त्यांनी आपली मतं सांगून आमच्या ज्ञानात भर टाकावी असा टोला राऊतांनी लगावला होता.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजपा नेते सर्वच पक्षांबद्दल बोलत असतात. अर्णब गोस्वामी यांच्यावर त्यांनी बोलले पाहिजे. देशाच्या सुरक्षेची माहिती बाहेर येणं राष्ट्रीय सुरक्षेसाठी धक्का आहे. अर्णब गोस्वामी राष्ट्रीय सल्लागार असल्याप्रमाणेच बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भूमिका मांडली पाहिजे असे सुद्धा बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5