Skip to content Skip to footer

बेस्टचे पाऊल आधुनिकीकरणाच्या दिशेने, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

बदलत्या मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्थेतही बदल होत आहेत. मेट्रोसह विविध पर्यायी वाहतूक व्यवस्थेमुळे बेस्टला स्पर्धा निर्माण होत आहे. अशावेळी बेस्ट आधुनिकीकरणाच्या दृष्टीने भक्कम पाऊले टाकत आहे. या पावलांना ताकद दिली जाईल अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे. वडाळा येथील बेस्ट उपक्रमाच्या अद्ययावत बस नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

‘बेस्ट प्रवासी सेवेमध्ये नावाप्रमाणे बेस्ट आहे. ऊन, वारा, पावसात बेस्टचे कर्मचारी काम करतात. पावसाळ्यात इतर सेवा विस्कळीत होतात परंतू बेस्ट सुरू असते. करोना संकटाच्या काळात जगभरात लॉकडाउन असताना जीवनावश्यक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी आपल्या हक्काची बेस्ट धावून आली. करोना विरुद्धच्या युद्धात बेस्ट उपक्रमातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘बेस्ट’ योगदान दिले आहे. त्यासाठी मुंबईकर कृतज्ञच राहतील, असे ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविले.

मुंबईत मेट्रोसह विविध वाहतूक सेवा सुरू होत असताना बेस्टला स्पर्धा निर्माण होत आहे. यात टिकण्यासाठी बेस्टला काळानुरूप बदलावे लागेल. मूळात इतर वाहतूक सेवा अणि बेस्टच्या सेवेत मुलभूत फरक आहे. बेस्ट गल्लीबोळात जाते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते.

Leave a comment

0.0/5