Skip to content Skip to footer

आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे गप्प का? आहेत – भाई जगताप

 

कर्नाटकव्याप्त सीमाभागातील मराठी भाषिकांचा भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरून चर्चा सुरू झाली. त्यावर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई केंद्र शासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केली होती. आता कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि भाजपा नेत्यावर सडकून टीका केली आहे.

जगताप म्हणतात की, भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील उपमुख्यमंत्री सवदी यांची मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दात निंदा करतो. सवदी यांना समजलं पाहिजे की ज्या महाजन समितीचा हवाला ते देत आहेत, तो अहवाल काय आहे? सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला मुंबईचा नाही. तो बेळगाव आणि जवळपासच्या मराठी भाषिक भागाचा आहे. मुंबईविषयी ते इतकं बेजबाबदार बोलू शकतात.

मला तर आश्चर्य वाटतंय की, भारतीय जनता पक्षाचे चमचे, भाजपाचे नेते, देवेंद्रे फडणवीस जे खूप मोठं मोठ्या गोष्टी बोलत असतात. त्यांना हे दिसत नाही का? मुंबईविषयी कर्नाटकाचा भाजपाचा उपमुख्यमंत्री बोलत आहेत आणि आपण मुंबईविषयी एक शब्द काढला नाही. गप्प बसला आहात. कंगना रणौतसारख्या दोन टक्क्यांच्या कलाकारांने मुंबईला पाकिस्तान म्हटलं होतं, तेव्हा हे देवेंद्र फडणवीस यांचे चमचे तिला झाशीची राणी म्हणत होते. आज भाजपा उपमुख्यमंत्री मुंबईविषयी बोलत आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहात. महाराष्ट्र व मुंबईविषयी तुमचं हेच प्रेम आहे का?,” अशी टीका भाई जगताप यांनी केली.

Leave a comment

0.0/5