केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलक मागच्या दोन महिन्यापासून दिल्ली येथे आंदोलन करणार आहे. त्यात आज निघणाऱ्या चक्काजाम आंदोलन दाबण्यासाठी ठिक-ठिकाणी रस्त्यात खिळे रोवण्यात आले आहेत. तसेच आंदोलन परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलेल्या आहेत.
कृषी कायद्यांविरोधातील या आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले आहेत. अमेरिकन पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गसह अनेकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता यूएन ह्यूमन राइटनं शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करत सल्ला दिला आहे.
रिहाना, ग्रेटा आणि मिया खलिफा यांनी ट्विट केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वेधले गेले. परदेशातील नामवंतांनी केलेल्या ट्विटवरून भारतात बरंच रणकंदन सुरू आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्टपणे भूमिका मांडत उत्तरही दिले आहे.
दरम्यान, आंदोलन सुरू असलेल्या परिसरामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बॅरिकेट्स आणि खिळे ठोकून रस्ते अडवण्यात आल्यानं आंदोलनकांची मूलभूत गरजांसाठी हेळसांड सुरू झाली होती. यूएन ह्यूमन राइटनं ट्विट करत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
“आम्ही भारतातील अधिकारी व आंदोलकांना सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलनादरम्यान जास्तीत जास्त संयम पाळावा. अभिव्यक्ती अधिकार शांततापूर्ण मार्गाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरक्षित राखले जावेत. या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणं सर्वांसाठी महत्त्वाचे झाले आहे,” असे यूएन ह्यूमन राइटनं म्हटलं आहे.
#India: We call on the authorities and protesters to exercise maximum restraint in ongoing #FarmersProtests. The rights to peaceful assembly & expression should be protected both offline & online. It's crucial to find equitable solutions with due respect to #HumanRights for all.
— UN Human Rights (@UNHumanRights) February 5, 2021