Skip to content Skip to footer

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांचे १ फेब्रुवारी पर्यंत सर्व कार्यक्रम रद्द

राज्यात गेल्या काही दिवसात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज २२ फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम,मिरवणूक,मोर्चे,यात्रांवर शासनाने बंदी घालण्यात आली असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आज पासून १ मार्च २०२१ पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम,बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक,धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे मंत्री देसाई यांनी सर्व नियोजित कार्यक्रम,बैठका रद्द केल्या आहेत.

दरम्यान या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता गृहविभागामार्फत नियम व बंधने घालण्याकरीता सर्व नियमांचे पालन करुन गृह विभागाच्या महत्त्वाच्या व अत्यंत तातडीच्या बैठका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे गरजेप्रमाणे घेणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी ‘होय मीच जबाबदार’ ही मोहिम राबवून मास्क घालणे,सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरने हातू धुणे हे त्रिसुत्री कार्यक्रम राबवून यातून लॉकडाऊन टाळणे चे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

Leave a comment

0.0/5