बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असलेली आणि एक आदर्श जोडी म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान ओळखले जाता. त्यांच्या लग्नाला जवळपास २९ वर्षे झाली आहेत.
गौरी ही पंजाबी कुटुंबातून आहे तर शाहरुख एक मुस्लीम कुटुंबातून आहे. लग्नाच्या वेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.शाहरुखने गौरीच्या कुटुंबीयांना इंप्रेस करण्यासाठी जवळपास पाच वर्षे प्रयत्न केले होते. त्यानंतर १९९१मध्ये दोघांनी लग्न केले.
-
दरम्यान, शाहरुखने गौरीच्या कुटुंबीयांसोबतचा एक किस्सा सांगितला आहे.
शाहरुखने लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळी गौरीच्या कुटुंबीयांसोबत मस्करी केली होती आणि ती पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. याचा खुलासा शाहरुखने फरीदा जलाल यांच्या एका मुलाखतीमध्ये केला आहे.‘मला आजही लक्षात आहे लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तिचे संपूर्ण कुटुंबीय, ओल्ड फॅशन लोकं होते. मी त्यांचा आदर करतो पण त्यावेळी त्या ओल्ड फॅशन रिसेप्शनमध्ये सगळे जण बसले होते’ असे शाहरुख म्हणाला.
-
पुढे तो म्हणाला मी जवळपास १.१५ला तेथे पोहोचलो. रिसेप्शनला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये, मी एक मुस्लीम मुलगा आहे. त्यामुळे लग्नानंतर गौरीचे नाव बदलणार का? आता गौरी मुस्लीम धर्म स्वीकारणार का? अशा चर्चा सुरु असल्याचे माझ्या कानावर आले.
-
8 / 15
‘मी सर्वांचे बोलणे ऐकत होतो. मी त्यावर प्रतिक्रिया देत म्हणालो, गौरी बुरखा परिधान कर आणि चला आता नमाज पठण करुया. त्यानंतर मी पुढे म्हणाले की आता ती दररोज बुरखा घालून घराच्या बाहेर पडणार आणि आम्ही तिचे नाव आयशा ठेवणार आहोत. ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले’ असे शाहरुख मजेशीर अंदाजात सर्वांसमोर बोलला होता.
-
पण शाहरुखने हे मस्करीमध्ये म्हटले असल्याचे कळाल्यानंतर सर्वांना हसू आले होते असे शाहरुखने म्हटले होते.
-
शाहरुखने गौरीला १९८४ मध्ये एका पार्टीमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं.तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा आणि गौरी १४ वर्षांची होती.
-
त्यानंतर अनेकदा त्याने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनंतर अखेर त्याने तिचा फोन नंबर मिळवला आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्री वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व्हायला फार काळ लागला नाही.
शाहरुख आणि गौरी वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता.
-
गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालताना शाहरुखच्या नाकीनऊ आलं होतं.
-
अखेर त्याने गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यात यश मिळवलं.
-
२५ ऑक्टोबर १९९१ रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. २६ ऑगस्ट १९९१ रोजी त्यांचं कोर्टात लग्न झालं. दोघांचा निकाहसुद्धा झाला. यावेळी गौरीचं नाव आयशा ठेवण्यात आलं होतं.