1) शिवाजी महाराजांची मूर्ती बाळासाहेब यांची प्रतिमा स्टेजवर आहे. त्यांच्या रांगेत आम्ही नाही बसू शकत म्हणून मी स्टेजच्या खालून तुमच्याशी बोलणार आहे .
2 ) जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्यापासून मी पाहतो आहे महाराष्ट्रातील जनता मला आशीर्वाद देत आहे मला भेटायला येत आहे.
3 ) ही जन आशीर्वाद यात्रा जोपर्यंत मी पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक गल्लोगल्लीत जात नाही तोपर्यंत ही यात्रा संपणार नाही.
4 ) निवडणुकींना अजून वेळ आहे पण ही जन आशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी नाही, मतं मागण्यासाठी नाही तर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे.
5 ) विजय संकल्प मेळावा हा आपण निवडणुकीनंतर घेणारच आहोत.
शिवसेनेच्या दणक्याने कृषी विभागाला आली जाग, पहिला हप्ता विमा कंपन्यांना सुपूर्त…..
6 ) गेली पाच वर्षे जनतेसाठी जे जे करता येईल ते ते सत्तेत राहून आणि गरज पडल्यास आंदोलने, निवेदने करून ती कामे केली आहेत.
7 ) हे सर्व करत असताना जनता आमच्या सोबत ठाम उभी राहिली म्हणून मी त्यांचे आभार मानण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे.