गाजर दाखवून सत्तेत आलेले हुकूमशाह पद्धतीने वागवत आहे…
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयका विरोधात विरोधक आक्रमक झालेले आहे. आता या कायद्याच्या विरोधात विरोधकांनी ‘खेती बचाओ’ यात्रा सुरु केली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या खेती बचाव यात्रा सोमवारी सांगरुळ जिल्ह्यात पोहचली.
यावेळी भवानीगड बाजार पेठेत झालेल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारानी सहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी एकही धोरण आणले नाही. ती सर्व धोरणे तीन ते चार निवडक उद्योगपती मित्रांसाठी बनवण्यात आली, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.