Skip to content Skip to footer

जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीला डुबवणार ?

राष्ट्रवादीचे कळवा-मुब्रा विभागाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या भाषणामुळे आणि वक्तव्यामुळे अनेक वेळा स्वतःला आणि पक्षाला अडचणीत आणले आहे. काही दिवसापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर कमेंट करतांना राफेलचा पहिला बळी म्हणून आव्हाडाची जीभ घसरली होती. त्यामुळे सोशल मीडियावर आणि नेटकऱ्यांनी चांगलेच जितेंद्र आव्हाडाना झाडले होते. आता काही दिवसापूर्वी मराठी न्युज माध्यमाला चालू असलेल्या मुलाखतीत भाजपा प्रवक्त्यांना चालू प्रोग्राम मध्ये शिवी देऊन राष्ट्रवादी पक्षाची संस्कृती महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे.

मराठी न्युज चॅनेलवर चालू असलेल्या आपल्या मुलाखतीत भाजपा प्रवक्ते शिरसाट यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जेव्हा अँकर यांनी सांगितले तेव्हा आव्हाडांनी ते उत्तर टाळले आणि भाजपा प्रवक्ता शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला. आपण राहत असलेल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे याचे भान सुद्धा जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले दिसत नाही आहे. पुढे प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकारावर सुद्धा आव्हाडांनी जोरदार टीका केली होती. आज शरद पवार इतरांना न्यान शिकवतात त्या पेक्षा त्यांनी आपल्या आमदाराला महिलांशी कसे बोलावे हे शिकविले तर अधीकच उत्तम होईल. जितेंद्र आव्हाड यांच्या या वागण्यामुळे ठाणे भागात राष्ट्रवादी भविष्यात टिकेल का? हाच प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे.

Leave a comment

0.0/5