लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यात आघाडीचे नेते गुंतले आहेत, अनेकांकडून पक्ष संघटनेत आलेल्या मरगळीमुळे शेवटच्या घटका प्रयत्न पोहचू शकलो नसल्याची भावना आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी संघाचे विचार पटत नसले तरीही त्यांच्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. पवार यांच्या विधानावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. कॉंग्रेस पक्ष आजवर संघाशी कायम संघर्ष करत आलेला आहेत, त्यामुळे त्यांचे अनुकरण करण्याची गरज नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेण्यासारखे काहीही नाही, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.