सध्या लॉकडाउन असल्याने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक लोक अडकले आहेत. महाराष्ट्रातही इतर राज्यांमधील अनेक मजूर अडकले आहेत. यामध्ये बिहारमधील मजुरांचाही समावेश आहे. यासाठी बिहारमधील आरजेडीचे आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन मदतीची मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यांच्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या नम्रतेचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे.
दोन मिनिटं २० सेकंदाची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल आहे. आरजेडीचे आमदार सरोज यादव यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या बिहारमधील मजुरांची मदत करण्याची मागणी करत होते. “सर नमस्कार, मी बिहारमधून आरजेडीचा आमदार बोलत आहे. माझ्या शहरातील काही कामगार तुमच्या येथे दोन-तीन ठिकाणी अडकले आहेत. त्यांच्याकडे अन्नासाठी पैसेही नाहीत,” असं सरोज यादव सांगतात.
https://www.facebook.com/388247148018023/videos/265488024641555/
महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी फक्त आश्वासन दिलं नाही तर तू पूर्णही केली. सरोज यादव यांनी उल्लेख केलेल्या हरिवंश चौधऱी यांनी शिवसेना शाखेतील लोक आले होते. त्यांनी आम्हाला अन्न पुरवलं असू आता आमची काही तक्रार नसल्याचं सांगितलं आहे.