Skip to content Skip to footer

कंगना प्रकरणात राज्यपाल केंद्राकडे राज्य सरकार विरोधात अहवाल पाठवणार?

कंगना प्रकरणात राज्यपाल केंद्राकडे राज्य सरकार विरोधात अहवाल पाठवणार? 

सिनेअभिनेत्री कंगना रणावत आणि शिवसेना पक्षात सुरु असलेल्या वादात आता राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी उडी मारली आहे. काल महानगर पालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या पाली हिल कार्यालयावर बुलडोझर चालवला होता. याविरोधात कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

आता या प्रकरणात खुद्द राज्यपाल कोश्यारी यांनी मध्यस्थी घेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत सिह राजपूत प्रकरण, अंतिम वर्षाच्या परीक्षा या सर्व निर्णयात राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. तसे ताशेरे सुद्धा सरकारवर ओढले आहे.

कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजोय मेहता यांना राजभवनात बोलवून भगतसिंह कोश्यारी यांनी या कारवाई वर असलेली नापसंती दर्शवली. कोश्यारी या वादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5