झाडाचं पान का तोडलं म्हणून उद्या भाजप आंदोलन करेल, जयंत पाटलांचा टोला

झाडाचं-पान-का-तोडलं-म्हणू-Let's say the tree's leaf is broken

झाडाचं पान का तोडलं म्हणून उद्या भाजप आंदोलन करेल, जयंत पाटलांचा टोला

आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सातत्त्याने करण्यात येत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तसंच झाडाचे पान का पडले म्हणूनही भाजपा आंदोलन करु शकते, असा टोलाही जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन भाजपाला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. आता मुंडे यांच्या विरोधातील तक्रार संबंधित महिलेने मागे घेतली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

जयंत पाटील म्हणाले की, “महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण मुळात आपण आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे, पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, पोलीस जो निष्कर्ष काढतील त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. त्यात पोलिसांनी काही निष्कर्ष काढला असेल आणि त्या महिलेमे तक्रार मागे घेतल्याचे आपण ऐकले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here