महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. युती-आघाडीची समीकरणं जुळवत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याचं कोडं सोडवण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीलाच प्रचंड बहुमत मिळू शकते असं सध्याचं वातावरण आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीसमोर युती कायम ठेवायची असल्यास जागावाटप तसेच सत्तावाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर ठरवण्याचं आव्हान आहे.…
काँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर शिवसेनेत, सोलापूरचे दिलीप माने वाटेवर
दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आज पुन्हा काँग्रेसला शिवसेनेकडून धक्का बसला आहे. दिंडोरी येथील काँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापूर्वी दिंडोरीच्याच धनराज महाले यांनी शिवबंधन बांधलं आहे. यामुळे…
शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव झाला.सलग चौथ्यांदा विजयी होण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या आढळरावांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल कोल्हे यांनी पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर आढळराव शिवसेना संघटनेत आणखीनच सक्रिय झाले. शिवसेना वर्धापनदिनी त्यांची उपनेते म्हणून नियुक्ती जाहीर झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्वांच्या सर्व मतदारसंघांवर युतीचा भगवा फडकवण्याचा त्यांनी…
आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार किंवा नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. लोकसभा निवडणुकीत युती करतानाच विधानसभेसाठी ती कायम राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र लोकसभेत भाजपला ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. यानंतर पुन्हा एकदा युतीचं नक्की काय होणार याच्या चर्चा प्रसारमाध्यमात रंगल्या. शिवसेना-भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मात्र…