राष्ट्रवादीला धक्का, पवारांसोबत प्रचार करून १२ तासाच्या आत भाजपात केला माजी आमदाराने प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षच खालसा झालेला दिसून येत आहे. पण आता मतदानाला काही दिवस उरले असताना भाजपाने राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघातील माजी आमदार…
पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता भ्रष्टवादी झाली आहे - उद्धव ठाकरे
करमाळा विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार रश्मी बागल यांच्या प्रचार सभेत बोलताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता भ्रष्टवादी झाली आहे, तर शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत…
बीड सोडून स्वतःच्या जिल्ह्यात लक्ष घाला, एखादी जागा वाढेल - पंकजा मुंडे
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी वाढलेली दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त आहे. त्यातच आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंडे आणि पवार यांच्यातील वाद वाढण्याची…
आम्ही 'नटरंग'सारखे काम केले नाही - देवेंद्र फडणवीस
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रती टीकेचा जोर वाढलेला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना आम्ही 'नटरंग'सारखे काम केले नाही. आम्हाला हातवारे करता येत नाही. उत्तर आम्हालाही देता येते. पण आम्ही देणार नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. आमचे पैलवान तेल लावून…
शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं!
आपल्याच पक्षाचं सरकार पाडून मुख्यमंत्री होणारे शरद पवार यांनी आजवर जे राजकारण केलं होतं ते आता त्यांच्यावर उलटताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रोज नवीन भगदाड पडत असून पक्षाची अवस्था चाळणीपेक्षाही वाईट झाली आहे. पवारांचं राजकारण नेहमीच फोडा आणि राज्य करा या रणनीतीवर अवलंबून आहे. पवारांनी शिवसेना-भाजपचे नेते फोडून…
अमोल कोल्हे यांच्या पायगुणामुळेच राष्ट्रवादीची वाईट अवस्था-आढळरावांचा घणाघात
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंच्या पायगुणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची वाईट अवस्था झाली असल्याची घणाघाती टीका केली आहे. याशिवाय कलम ३७० मुद्द्यावर मतदान न करता अमोल कोल्हे पळून गेले. त्यामुळे त्यांनी माझी चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या देशद्रोही भूमिकेची काळजी करावी असा टोला…
पवारांनी जे केलं ते उद्धव ठाकरेंनी व्याजासह परत केलं!
आपल्याच पक्षाचं सरकार पाडून मुख्यमंत्री होणारे शरद पवार यांनी आजवर जे राजकारण केलं होतं ते आता त्यांच्यावर उलटताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रोज नवीन भगदाड पडत असून पक्षाची अवस्था चाळणीपेक्षाही वाईट झाली आहे. पवारांचं राजकारण नेहमीच फोडा आणि राज्य करा या रणनीतीवर अवलंबून आहे. मात्र आता…
भास्कर जाधव यांच्यासोबत शंभराहून अधिक नेते शिवसेनेत प्रवेश करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव हे येत्या १३ तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा प्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे. जाधव यांच्यासोबत थोडेथोडके नव्हे तर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मिळून शंभर पेक्षा जास्त…
राष्ट्रवादीला खिंडार:अवधूत तटकरे आणि भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव हे येत्या १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीतुन लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिग्गज नेत्यांनी…
शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीनवेळा विजय मिळवणारे शिवाजी आढळराव पाटील यंदा पराभूत झाले. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल कोल्हे यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला. आढळरावांनी विकास केलाच नाही असा प्रचार करणाऱ्या कोल्हेंना छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा सहारा मिळाला. त्याच बळावर ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार म्हणून विजयी झाले. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आणि…