कोलकाता : 'आणखी पाच-सहा षटकांचा खेळ होऊ शकला असला असता, तर सामना आमच्या बाजूने झुकला असता', अशी भावना भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुल याने व्यक्त केली.
कर्णधार विराट कोहलीच्या शतकानंतर महंमद शमी-भुवनेश्वर कुमार-उमेश यादव या वेगवान त्रिकुटाने काल (सोमवार) श्रीलंकेला पराभवाच्या उंबरठ्यावर नेले होते.
पण अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला आणि भारत-श्रीलंकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित…
कोलंबो क्रिकेट - श्रीलंकेत धावांचा पाऊस पाडत असलेल्या भारतीय फलंदाजांनी आज यजमान संघाची गोलंदाजी लुटली. विराट कोहली व रोहित शर्मा यांची तुफानी शतके आणि त्यानंतर मनीष पांडे व महेंद्रसिंह धोनी यांच्या टोलेबाजीच्या जोरावर ३७५ धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने चौथा क्रिकेट एकदिवसीय सामनाही जिंकला.
धावांचे भलेमोठे पाठबळ मिळाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले आणि लंकेचा डाव २०७…