कोल्हापुरात सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मागील सहा आणि सात दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कोल्हापुरात बिकट पूरस्थिती निर्माण झालेली आहे. तर कोल्हापुरातील अनके गावांचा संपर्क तुटलेला आहे. यातच अनेक सामाजिक आणि राजकीय मंडळी या पुरग्रस्थ भागातील लोकांच्या मदतीसाठी सरसावले आहे. आज अनेक एनजीओ पुरग्रस्थांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे आलेले आहे. परंतु या परीस्थितीत सुद्धा काही राजकीय पुढारी राजकारण करताना दिसत आहे.
शिवसेना-भाजप नेते मदतीला, अमोल कोल्हे मात्र सेल्फी आणि सत्कारात गुंग
एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर परिस्थिती संदर्भात मुंबईत बैठक घेऊन १ कोटी अर्ध्या तासात जमवले तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते मंडळी पुरग्रस्थांना वाटण्यात येणाऱ्या खाण्याच्या वस्तूवर आपले फोटो टाकून येणाऱ्या निवडणुकीचा जणू प्रचारच करत आहे.