Skip to content Skip to footer

“नीच राजकारणाचा कळस”, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांचे ट्विट…..!

“नीच राजकारणाचा कळस”, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांचे ट्विट…..!

सिनेअभिनेता सुशांतसिह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्यातील विरोधी पक्षाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्त करण्याची मागणी केली होती. तसेच भाजपाने सुशांतसिह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपाच्या या रवय्यावर युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला आहे

“३ महिन्यापूर्वी जेव्हा सगळे घरी घाबरून बसलेले होते, तेव्हा रस्त्यावर आपल्यासाठी उतरले ते आपले पोलीस ! गरज पडल्यास त्यांच्या करिता टाळ्या, थाळ्या आणि दिया आता बिहार निवडणूक आली की शिव्या ??? नीच राजकारणाचा कळस ! #महाराष्ट्रद्रोही भाजपा #WeTrust Mumbai police”, असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे.

तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संकटाला आळा घालण्यासाठी तसेच शांतता आणि सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मुंबई पोलीस २४-२४ तास ड्युटी करून आपले कर्तव्य निभावत आहे. त्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. आज त्याच पोलिस कर्मचारी वर्गावर फक्त येणाऱ्या बिहार निवडणुकीवर लक्ष ठेऊन टीका करण्याचा केविलवाणा प्रकार भाजपा नेत्यांनी सुरु केला आहे. त्याच विरोधात वरून सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a comment

0.0/5