Skip to content Skip to footer

२३ दिवसात शेतकऱ्यांना मदत जाहीर करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

२३ दिवसात शेतकऱ्यांना मदत जाहीर करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

राज्यात परतीच्या पावसामुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर जाहीर करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र मला नवीन नाही. यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. तुमच्या वेदना, व्यथांना आवाज देण्याचं काम मी तेव्हा करत होतो. माझं कर्तृत्व शून्य आहे, पण तुमच्या आशिर्वादामुळे मुख्यमंत्री झालो आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखविले. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, “आजची परिस्थिती भयानक आहे. आपण संकटाता सामना केला नाही असं काही नाही. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आलं आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला”.

आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. अतिवृष्टी होण्याच धोका कमी झाला आहे. पण पुढील सात ते आठ दिवस वातावरण बिघडू शकतं असं हवामान विभागाने सांगितलं आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असं बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरं वाटावं, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5