तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू, संजय राऊतांनी सुनावले विरोधकांना खडेबोल

मोदींनी-लंडनमध्ये-जाऊन-ड-Modi-going-to-London-d

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या निमित्ताने विरोधक सध्या महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. महाविकास आघाडीवर टीका करताना धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुद्धा राजीनामा मागत आहे. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांवर या संदर्भात भाष्य केले आहे.

विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे आघाडी सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असं जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखंच आहे असे म्हणत भाजपा नेत्यांना चिमटा काढला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here