Skip to content Skip to footer

आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच!

 

महाराष्ट्र बुलेटिन : ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून दर तीन महिन्यांनी सरकार पडणार असल्याचे बोलले जाते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार हे अतिशय उत्तमरीत्या काम करत आहे आणि सत्तेत येऊन सरकारला सव्वा वर्ष पूर्ण झाले असून आमचे सरकार हे पाच वर्ष टिकणार,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुद्देमाल पुनःप्रदान व अनुपंपा भरती पोलीस पाल्य नियुक्तिपत्र या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. कार्यक्रमांनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान पवार म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारला सव्वा वर्ष पूर्ण झाले आहेत. तरीही दर तीन महिन्यांनी महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार अशी बिनबुडाची वक्तव्य विरोधकांकडून केली जातात. परंतु विरोधकांनी हे लक्षात घ्यावे की आमचे सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे.’ तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायला सरकार घाबरत आहे असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावर उत्तर देताना अजित पवारांनी सांगितले की, ‘पाटील यांच्या वक्तव्यात कुठलेही तथ्य नसून सर्वकाही खोटे आहे.’

Leave a comment

0.0/5