Skip to content Skip to footer

Maharashtra School Reopen: राज्यात १७ ऑगस्टपासून उघडतील शाळा, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी सांगितले की १७ ऑगस्टपासून ग्रामीण भागात ५-७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या जातील. तसेच शहरांमध्ये कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करून राज्य सरकार ८ ते १२ वीच्या वर्गांसाठी शाळा पुन्हा उघडेल. आपल्याला माहित असावे की कमी संक्रमण दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये ७ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग उघडण्याची परवानगी आधीच देण्यात आलेली आहे. यातील बहुतेक जिल्हे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील आहेत. परंतु मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागात ही सूट देण्यात आलेली नाही कारण तेथे कोविडची अधिक प्रकरणे आहेत.

शिक्षण मंत्री म्हणाल्या की, “ग्रामीण भागात जिथे इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग आधीच सुरू झाले आहेत, तिथे ५ वी ते ७ वी पर्यंतचे वर्ग देखील पुन्हा सुरू होतील. शहरी भागात जेथे ऑफलाईन वर्ग चालू नव्हते, तेथे ८ वी ते १२ वीचे वर्ग पुन्हा सुरू केले जातील.”

ग्रामीण भागातील शाळा गेल्या महिन्यात उघडल्या होत्या

राज्यात गेल्या महिन्यात ग्रामीण भागातील शाळा ८ वी ते १२ वी साठी जवळपास ६००० शाळा उघडण्यात आल्या होत्या. सुमारे ५९४७ शाळांनी ग्रामीण भागात ८ ते १२ च्या वर्गांसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू केले होते. या व्यतिरिक्त, २ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सरकारने १४ जिल्ह्यांमध्ये कोविड निर्बंध शिथिल केले होते.

कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये उघडतील शाळा

कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांनी देखील शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. कर्नाटकात २३ ऑगस्टपासून ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू होतील, तर तामिळनाडूमध्ये १ सप्टेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू होतील.

Leave a comment

0.0/5