नवी दिल्ली | भारतात माझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे मायदेशात परतण्याची माझी इच्छा नाही, असं पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीने म्हटलं आहे.
‘ईडी’सोबत ई-मेलच्या माध्यमातून झालेल्या संवादात त्याने असं म्हटलं आहे.
होळीला लोकांनी माझ्या पुतळ्याचे दहन केले, हे मी पाहिले आहे. त्यासोबतच कर्मचारी, घरमालक, ग्राहक, संस्था हे मला सतत धमकावत आहेत, असं त्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, भारतात माझ्या जिवाला धोका आहे. भारत माझ्यासाठी सुरक्षित जागा नाही, असंही त्यानं सांगितलं आहे.